फलटण, (प्रतिनिधी) – मेघालयची राजधानी शिलाँग येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत फलटण येथील कु. ऋतुजा विनय गाटे हिने धनुर्विद्या (आर्चरी) कंपाउंड मिक्स प्रकारामध्ये कांस्यपदक मिळवले.
यापूर्वी तिने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत कांस्यपदक, महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि विभागीय विद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत. ती सध्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये बीसीए सायन्सच्या प्रथम वर्षात शिकत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते चंद्रकांत इलग (बुलढाणा) आणि सूरज ढेंबरे (फलटण) यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल ऋतुजाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.