मुंबई – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची लोकांना खूप उत्सुकता होती. अखेर दोघांचे लग्न ठरलेल्या वेळेनुसार अतिशय साध्या पद्धतीने पार पडले आहे. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत सात फेरे घेतले आहेत. 3 ते 3:30 वाजताच्या दरम्यान त्यांनी फेरे घेतल्याची माहिती समोर आली आहे. आलिया भट्ट आता आलिया कपूर झाली आहे. मुंबईतील वास्तू बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला.
View this post on Instagram
लग्नासाठी सकाळपासूनच त्यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी जमत होती. करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, आधार जैन, रणबीर कपूरची आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर आणि तिची मुलगी समरा साहनी, महेश भट्ट, पूजा भट्ट, सोनी राजदान याशिवाय दिग्दर्शक लव रंजन, अयान मुखर्जी आणि करण जोहर यांच्यासह प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यानेही या लग्नाला हजेरी लावली होती.
According to media reports, #RanbirKapoor and #AliaBhatt are now man and wife. Our heartiest congratulations to the beautiful couple! 💛❤️ pic.twitter.com/KRMyzfUaKw
— Filmfare (@filmfare) April 14, 2022
लग्न व्यवस्थित पार पडल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. रणबीर आणि आलियाचे चाहते खूप खुश आहेत. बॉलीवूडचे बेस्ट कपल म्हणून ओळखले जाणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आता कायमचे एकमेकांचे झाले आहेत.
View this post on Instagram
‘ब्रह्मास्त्र’च्या वेळी एकमेकांच्या जवळ आले –
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यात ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटादरम्यान डेटिंग झाली होती. त्यावेळी ही बातमी तितकी मोठी वाटली नाही, पण जसजसे दोघांचे फोटो एकत्र आले, तसतसे लोकांना खात्री पटली की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि या नात्याला पुढे नेण्यासाठी खरोखर गंभीर आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram