मुंबई -राज्यात काही दिवसांवर राज्यातील मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका ठेपल्या आहेत. त्याआधीच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर सडकून टीका केली होती. तर भाजपचे कौतुक केलं होतं. या सभेनंतर मनसे भाजपची बी टीम असा आरोप विरोधक करत आहेत. मात्र या आरोपावर काल झालेल्या ठाण्यातील ‘उत्तर सभेत राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारवर चौफेर टीका केली.
यातच मनसे भाजपची बी टीम असा आरोप विरोधक करत असतांना आता आज पत्रकार परिषद घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची स्वतंत्र ओळख आहे. राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले,’ राज ठाकरेंच्या पाडव्याच्या सभेनंतर विरोधक मनसे ला भाजपची बी टीम म्हणत आहे. महाविकास आघाडी खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन इको सिस्टम चा वापर करत आहे. यासाठी ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी बोलायचं, पुण्यात अजित पवारांनी बोलायचं. आता तर आदित्य ठाकरेही यात सामील झालेत, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला.
चंद्रकांत पाटील यांचे फेसबुक लाईव्ह