राहुरी, (प्रतिनिधी): राज्यात सत्ता असताना व राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली तरी कामे करण्यात ते अपयशी ठरले. आमचे सरकार असल्याने आम्ही कामे मंजूर करून आणतो आणि तनपुरे फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचे काम करतात, अशी टीका करत ५३ वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे पाणी आज शेतकऱ्यांना पाहायला मिळाले, हा आयुष्यातील सुवर्ण क्षण असल्याची भावना जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली.
राहुरी तालुक्यातील निंभेरे-कानडगाव परिसरात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले निळवंडे धरण कालव्यांचे पाणी आज वाहू लागले. या पाण्याचे जलपूजन माजीमंत्री कर्डिले व खा.डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्रीताई विखे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी तालुका अध्यक्ष नानासाहेब गागरे होते.
धनश्रीताई विखे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आज आनंद पहायला मिळाला याचे समाधान वाटते. ५३ वर्ष संघर्ष करावा लागला. परंतु लवकरच हा भाग आता सुजलाम सुफलाम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, ५३ वर्षानंतर हा सुवर्णक्षण उजाडला आहे. आमचा वनवास संपला. आमच्या व्यथा विखे-कर्डिले यांनी जाणल्या. सदर कामाचे श्रेय भाजपचे आहे.
सत्ता असतांना ज्यांना काही करता आले नाही त्यांनी आता फ्लेक्स लावून फुकटचे श्रेय घेऊ नये, अशी टीका त्यांनी आ.प्राजक्त तनपुरे यांच्यावर केली. माजी खा.प्रसाद तनपुरे आमदार असताना त्यांनी त्यावेळी निळवंडे कालवा अस्तित्वात आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही, असे उत्तर दिले होते. त्यांना आमच्या व्यथा काय समजणार असेही त्यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, युवा तालुका अध्यक्ष धीरज पानसंबळ, शहराध्यक्ष भैय्यासाहेब शेळके, युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, कारखाना संचालक रविंद्र म्हसे, मधुकर गागरे, कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे, माजी सभापती भिमराज हारदे, सोपान गागरे, संदीप घाडगे, शांताराम सिनारे, उमेश शेळके, आण्णासाहेब बलमे, बाबासाहेब गाढे, गणेश ओहोळ, मारुती नालकर, किरण कोळसे, संदीप गिते, डॉ. बापूसाहेब मुसमाडे, विलास मुसमाडे, लक्ष्मण ढगे, उत्तम मुसमाडे, बबन कोळसे, वसंत डुक्रे, सुभाष अंत्रे, विशाल लोंढे, कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, उपअभियंता प्रमोद माने, नाना महाराज गागरे, जेष्ठ नागरिक गोपीनाथ गागरे, आण्णा महाराज गागरे, विष्णू सिनारे, मनोहर महाराज सिनारे, बाळकृष्ण हारदे, सरपंच निशाताई गागरे, विकास कोबरणे, साहेबराव कोबरणे, पोपट कोबरणे, राजू कोबरणे, मच्छिंद्र कोळसे आदींसह लाभधारक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.