नवी दिल्ली – सध्याच्या सणासुदीच्या काळातही इंधन आणि गॅसची दरवाढ सुरूच आहे. तसेच अन्यही जीवनावश्यक वस्तुंची महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ट्विटरवरून चांगलाच निशाणा साधला आहे. वाढत्या महागाईने सणासुदीचा काळ काळवंडला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या 11 दिवसांत पेट्रोलच्या किंमती 2 रूपये 35 पैशांनी आणि डिझेलच्या किंमती 3 रूपयांनी वाढल्या आहेत एलपीजी गॅसचे दरही गगनाला भिडले आहेत या वृत्ताचा दाखला देत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ही टीका केली आहे.
काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच एलपीजी गॅस सिलिंडरचा दर पंधरा रूपयांनी वाढला आहे त्याचा दाखला देत कॉंग्रेसने कालच या दरवाढीवर टीका केली होती. सर्वच क्षेत्रातील महागाईवर कॉंग्रेसकडून सातत्याने सरकारवर ताशेरे झाडले जात आहेत.