राधिका आपटेने आपल्या लेटेस्ट इंटरव्ह्यूमध्ये काही सनसनाटी आरोप केले आहेत. एरवीही ती थोडी स्पष्ट बोलण्यासाठीच प्रसिद्ध आहे. रामगोपाल वर्माच्या “रक्तचरित्र’मध्ये तिने काम केले होते.
या सिनेमाच्या शुटिंगच्यावेळी तिला शोषित झाल्यासारखे वाटायला लागले होते. हा सिनेमा करावा की नाही याबाबत तिच्या मनात संदेह निर्माण झाला होता. या सिनेमासाठी आपला चक्क वापर करून घेतला गेला.
“रक्तचरित्र’साठी आपल्याला चांगले मानधन दिले गेलेले नव्हते. “रक्तचरित्र’ या एकाच सिनेमासाठी काम करायचे आहे, असे आगोदर सांगितले गेले होते.
मात्र, नंतर तमिळ आणि तेलगू सिनेमासाठीही शूटिंग करायला लागले होते. त्या सिनेमात काही मोठे स्टारदेखील होते. त्याचे शूटिंगदेखील वेळेवर होत नव्हते.
मात्र या सिनेमातून आपले टॅलेन्ट लोकांसमोर येईल की नाही आणि लोकांकडून कौतुक तरी होईल की नाही, याबाबत नेहमीच राधिकाच्या मनात चलबिचल सुरू राहिली होती.
रामगोपाल वर्माच्या कामाची राधिका खूप मोठी फॅन होती. तिला याचा आनंदही होता. मात्र, प्रत्यक्ष शूटिंगच्यावेळी दुसऱ्या कोणाला झुकते माप दिले जात होते, असे राधिका म्हणाली.
“रक्तचरित्र’ हे पॉलिटिकल थ्रिलर फिल्म होती. त्यामध्ये विवेक ओबेरॉय, शत्रुघ्न सिन्हासारखे बडे स्टार होते.