सासवड – पुरंदर तालुक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार होते असे फक्त ऐकून होतो. ते पहिल्यांदा तळेगाव, चाकण या भागात होणार होते. पुणे येथे लष्कराचे विमानतळ या भागात आहे. लष्कराच्या या विमानतळावर मोठी
गर्दी असते. या ठिकाणी चढणे-उतरण्यासाठी लोकांना मोठी अडचण निर्माण होते, असे संसदेमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुरंदरच्या विमातळावर प्रश्न उपस्थित करून पुरंदरचा विमानतळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पाटील म्हणाले की, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी या भागात आहे. विमानतळा संदर्भात पुणे व सातारा या भागातील अधिकारी या ठिकाणी आहेत. पुणे ही आयटीची कंपन्यांची नगरी झाली आहे. पुण्यामध्ये विमानतळ होणे गरजेचे आहे.
पुण्याची लोकसंख्या 60 लाखांपेक्षा अधिक आहे. पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विमानतळ होणे अत्यंत गरजेचे आहे. लवकरात लवकर हे विमानतळ सुरू करावे व प्रश्न मार्गी लावावे असे निवेदन संसदेत त्यांनी केले.