पुणे -“दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता 100 टक्के कॉपीमुक्त अभियान पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा,’ असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) ची परीक्षा दि.21 फेब्रुवारी ते 22 मार्च या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्राची (इ.10वी) परीक्षा दि.2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून परीक्षा कालावधीत परीक्षा केद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त म्हणाले…
परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाहीत.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उद्बोधन करणार
विभागनिहाय व जिल्हानिहाय भरारी पथक, दक्षता समिती
लोकप्रतिनिधी ते स्थानिक स्तरावरील सर्व घटकांनी सहकार्य करावे