पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात पावसाचा जोर कमी होता.मात्र, गेल्या २४ तासात धरणसाठयात रविवार सकाळ ते सोमवार सकाळपर्यंत एक टीएमसी पाणी वाढले आहे. विशेष म्हणजे धरणात मागील वर्षी याच दिवशी असलेल्या पाणी साठ्यापेक्षा या वर्षी जास्त झाला आहे.
खडकवासला -१७ मिमी, पानशेत -८५ मिमी, वरसगाव – ७४ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७४ मिमी पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा ८.७० टीएमसी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.६३ टीएमसी होता.
पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या काळात मुसळधार पाऊस पडून समाधानकारक पाणीसाठा जमा होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.