दावडी -नागरिकांना मूलभूत गरजा मिळाल्या तर नागरिक गाव सोडून शहराकडे जाण्याचा विचार करणार नाहीत. रस्ते केलं म्हणजे अडचणी निर्माण होत नाही. लोकसंख्या वाढत असल्याने आपल्या गावात सुविधा कमी पडत आहेत. सुधारणा झाल्यानंतर गावाचं महत्त्व वाढणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
दावडी (ता. खेड) येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा भूमिपूजन कार्यक्रम आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये जल जीवन योजना आणि रस्ते असतील. वाढती लोकसंख्या पाहता मार्ग सुखकर होण्यासाठी, रस्त्याचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. शरीरातल्या रक्त वाहिन्या तसे रस्त्याचे जाळे तालुक्यात विणलं जाणार आहे.
यामध्ये शेती जाणार आहे; मात्र याचा फायदा येथील नागरिकांना होणार असल्याचे आमदार मोहिते यांनी सांगितलेजल जीवन मिशन अंतर्गत 21 कोटी रुपये तर दावडी- पिंपळगाव रस्त्यासाठी 2 कोटी 85 लाख व इतर 1 कोटीच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी सदस्य अनिल राक्षे, वंदना सातपुते, अशोक राक्षे, पं. स. माजी सदस्या वैशाली गव्हाणे, सयाजी मोहिते, सरपंच माधुरी खेसे, हिरामण खेसे, संभाजी घारे, अनिल नेटके,
संतोष गव्हाणे, मारुती बोत्रे, संगीता मैंद, राणी डुंबरे, धनश्री कान्हूरकर, मारुती बोत्रे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, मयूर मोहिते, सुरेश डुंबरे, बाजीराव डुंबरे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, विद्या मोहिते, दादाभाऊ दुधवडे, गणेश गव्हाणे, पुष्पा होरे, सुभाष टाकळकर, उमेश मोरे, निलेश आंधळे उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच माधुरी खेसे यांनी केले, सूत्रसंचालन तुषार वाटेकर तर संतोष गव्हाणे यांनी आभार मानले.