अकलूज – माळशिरस तालुक्यातील नेवरे येथे एका चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी अकलूज पोलिसांनी तिघांना अटक केली. माळशिरस न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. गणेश पांडुरंग गायकवाड (वय 25) याचा चार महिन्यांपूर्वी करमाळा येथील सुभाष जाधव यांची कन्या कोमल हिच्याशी 20 ऑगस्ट 2022 रोजी विवाह झालेला होता.
लग्न झाल्यापासून यातील आरोपींनी तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच मानपान दिला नाही, तुला घरातील कोणतेच काम निट येत नाही, गॅरेजसाठी पैशाची गरज आहे तू तुझ्या आई-वडिलांकडून 15 हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून वेळोवेळी जाच केला. लग्नात योग्य मानपान व सणावारास कपडेलत्ता घेतला नाही,
या कारणावरून दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी या नवविवाहितेला गळा दाबून तिचा खून केला. यामध्ये नवरा गणेश, सासरा पांडुरंग रामचंद्र गायकवाड व सासू मनिषा गायकवाड या तिघांविरुद्ध पोलिसांनी या नवविवाहितेची आई राणी सुभाष यादव (रा. करमाळा) यांनी फिर्याद दिली.