नेरुळ ते तुळजापूर पदयात्रा करणाऱ्या सागर पवारचे काटेवाडीत स्वागत
काटेवाडी – अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी नवी मुंबई येथील सागर पवार यांनी नेरूळ ते तुळजापूरपर्यंत पदयात्रा सुरू केली आहे. आज काटेवाडी येथील माजी सरपंच विद्याधर काटे, सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे, सागर भिसे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी इंदापूर या ठिकाणी सागर पवार यांचे भव्य स्वागत केले.
नवी मुंबई येथील नेरूळ ते तुळजापूर असा पायी चालत जाण्याचा निर्णय एका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला. त्याचे नाव सागर पवार, 15 नोव्हेंबरला बलप्रतीपदेच्या मुहूर्तावर सागर पवार यांनी नेरूळपासून तुळजापूरपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्णय घेऊन पायी चालत जाण्यास सुरुवात केली. केवळ अजित पवार यांना आपले दैवत मानणारा हा कार्यकर्ता असल्याने अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळी छाप निर्माण झालेली आहे.
आजपर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान मिळाला; परंतु या अशा कर्तृत्ववान नेत्याला मुख्यमंत्री झालेले राज्यातील सर्व जनतेला पाहिजे आहे. म्हणूनच ही जनतेची इच्छा पूर्ण होण्यासाठी सागर पवार याने नेरूळ ते तुळजापूरपर्यंत पदयात्रा काढून तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेला अभिषेक करून साकडे घालणार आहे. आमच्या कर्तबगार नेत्याला मुख्यमंत्री पदी काम करण्याची संधी मिळावी. यासाठी गेली पंधरा दिवस हा सागर पवार तरुण कार्यकर्ता नेरूळ ते तुळजापूर पर्यंत पायी प्रवास करत आला आहे.
काटेवाडी येथील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी इंदापूर येथे जाऊन केलेल्या स्वागतामुळे सागर पवार हे भारावून गेले असून खऱ्या अर्थाने काटेवाडीकरांचे त्यांनी आभार मानले व तुळजाभवानी चरणी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करण्यासाठी मी आलो आहे.