केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलीप मेदगे यांचे निवेदन
नारायणगाव, खोडद, गायमुख फाटा, भोरवाडी येथे उड्डाणपुलांची आवश्यकता
मंचर – राजगुरूनगर ते सिन्नर रस्त्यावरील आंबेगाव तालुक्यातील गायमुखफाटा भोरवाडी व नारायणगाव, खोडद रस्त्यावरती उड्डाणपुलाची गरज आहे. भविष्यातील मोठे अपघातग्रस्त पॉईंट बनत चालले आहेत, उर्वरित ठिकाणी सेवा रस्त्याची अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या सूचना कराव्यात याबाबतचे निवेदन पुणे येथे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे, अशी माहिती पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली.
पुणे-नाशिक महामार्गावरती दिवसेंदिवस वाहतूक समस्या वाढत असून या 27 किलोमीटर अंतरामध्ये मंजुरी मिळालेल्या एलेवेटेड कॉरिअडॉर संपूर्ण उड्डाणपूलचे काम अनेक दिवस निविदा प्रक्रियेमध्ये अडकून पडले आहे. मंचर बायपास व कळंब बायपास तसेच खेडघाट आणि नारायणगाव बायपास ही कामे पूर्ण झाल्यामुळे 30 ते 40 मिनिटांचा प्रवास त्यामुळे सध्या वाचू लागला आहे.
आळेफाटा बायपासचे काम रेंगाळले असून याबाबत अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच या भागांतील तुकाई मंदिर मंचर भोरवाडी व नारायणगाव खोडद रस्त्यावरती उड्डाणपुलाची गरज असल्याचे याही कामांचा तातडीने शुभारंभ व्हावा कारण हे भविष्यातील मोठे अपघातग्रस्त पॉईंट बनत चालले आहेत उर्वरित ठिकाणी सेवा रस्त्याची अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला कराव्यात अशी ही मागणी मेदगे यांनी केली.