बारामती : राहुरी येथे राजाराम आढाव व मनीषा आढाव या दाम्पत्याचा खंडणी मागून खून केल्याच्या घटनेच्या निषधार्थ बारामती वकील संघटनेने कोर्ट कामापासून अलिप्त राहत विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार करे याना दिले.राज्यात सर्वत्र वकील दाम्पत्याच्या हत्येचे पडसाद पडत असताना बारामती वकील संघटनेने वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त केला.
बारामती वकील संघटनेने बैठक घेवून अनेक ठराव सर्वसंमतीने मंजूर केले.त्यामध्ये कोणत्याही सदस्याने त्या आरोपीचे वकीलपत्र घेवू नये,वकील संरक्षण कायदा त्वरीत पारीत करून त्याची अंमलबजावणी करावी,विधी तज्ज्ञाना संरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत ,व वकिलाना २५ लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळण्यासाठी तरतूद व्हावी अशा मागण्या चे निवेदन प्रशासनाला देणेत आले.
नायब तहसीलदार करे यानी स्वत: न्यायालयासमोर येवून हे निवेदन स्वीकारले . यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड उमेश काळे यानी एकजुटीने आपण सनदशीर मार्गाने लढा लढू असे सांगीतले.यावेळी उपाध्यक्ष काकासाहेब आटोळे ,योगेश गाडेकर,शिवाजी भोइ,राजेंद्र मासाळ इ पदाधिकारी व ज्येष्ठ वकील ऍड.रमेश कोकरे,ॲड.नितीन भामे ,नंदकुमार भागवत,ॲड संजन मोरे ,ॲड राजेंद्र काळे ,ॲड.गणेश आळंदीकर ,ॲड.अजित कोकरे,ॲड शीतल देशमुख,ॲड शिपकुले,यांचेसह महिला सदस्य ॲड.सोनाली मोरे,ॲड.कीर्ती गाढवे,ॲड.कांचन देवकाते ,ॲड सीमा लोंढे यांचेसह मोठ्या प्रमाणात वकील हजर होते. न्यायालय परिसरात निवेदन दिल्यानंतर आवाराबाहेर वकिलांनी या घटनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.