नगर – जिल्हयातील शिक्षक ज्ञानदानाचे चांगले कार्य करत असून जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट करण्यामध्ये शिक्षकांचे योगदान मोठे आहे. जिल्ह्यातील बारा हजार शिक्षकांची पालक म्हणून त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी दिली. जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळ यांचे वतीने नूतन पदाधिकारी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर कार्यक्रमास कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती काशिनाथ दाते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. मिराताई शेटे,शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद ,जिल्हाआरोग्य अधिकारी संदीप सांगळे आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहकले यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडले .यामध्ये प्रामुख्याने पीएफ प्रकरणे मंजूरी, वैदयकीय प्रस्ताव मंजूरी, न्यायालयीन आदेशाने गेल्यावर्षी बदली झालेल्या शिक्षकांच्या चूकींच्या बदल्या दुरुस्त्या, एलआयसी कपाती पूर्ववत सुरू करणे , मुख्याध्यापक प्रमोशन तत्काळ करणे आदी प्रश्नांच्या सोडवणूकीचा आग्रह धरला.
याप्रसंगी शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी तर आभार गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी मांनले सूत्रसंचलन डॉ. रेवणनाथ पवार यांनी केले.
कार्यक्रमास परिषदेचे कार्याध्यक्ष राम निकम, महिला आघाडी अध्यक्षा मिनाक्षी तांबे, उच्चाधिकार समिती अध्यक्ष आर.पी.राहाणे, विकास मंडळ अध्यक्ष संजय शिंदे, बॅंकेचे माजी उपाध्यक्ष दिलीपराव औताडे, संचालक राजेंद्र मुंगसे,संतोष अकोलकर, रा.वि. शिंदे, दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब मगर, बाळासाहेब शेळके ,कल्याण राऊत संजय म्हस्के आदि उपस्थित होते.