नवी दिल्ली – विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप बालिशपणाचे आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. ते म्हणाले की, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असा आरोप करणे अचंबित करणारे आहे.
उपराष्ट्रपती पदाचा निकाल काय लागणार आहे हे सर्वांनाची माहिती असल्याने त्या विषयी आम्ही चिंता करीत नाही आणि त्यांचे फोन टॅपिंग करण्याची आम्हाला गरज नाही. त्यांना कोणालाही फोन करण्यास अनुमती असून त्यांनी अशा प्रकारचे आरोप करू नयेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
दुर्दैवी: विजा कोसळून 20 जणांचा मृत्यू
अल्वा यांनी मंगळवारी आरोप केला आहे की, ‘नव्या’ भारतातील राजकीय नेत्यांमधील संभाषणे फोन टॅप करून ऐकली जात आहेत. माझ्या फोन कनेक्शनमध्ये अडथळे निर्माण केले गेले असून आपल्याला कोणालाही फोन करता येत नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे. वाटल्यास मी भाजप आणि टीएमसी नेत्यांना आणि खासदारांना फोन करणे थांबवते पण माझा फोन एमटीएनएलने नीट सुरळीत करून द्यावा, असे आवाहनही मार्गारेट अल्वा यांनी केले आहे. त्यावर प्रल्हाद जोशींनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
Booster Dose: केवळ 11 टक्के प्रौढांनी घेतला करोनालसींचा बूस्टर डोस