पाटणा – बिहारमधील 8 जिल्ह्यांत विजा कोसळण्याच्या घटना घडल्या. 24 तासांत घडलेल्या त्या घटनांत 20 जण मृत्युमुखी पडले. कैमूर जिल्ह्यात सर्वांधिक 7 जण दगावले. विजा कोसळण्याच्या घटना भोजपूर, पाटणा, जहानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांतही घडल्या. त्यामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत जाहीर केली.
जनतेने खराब हवामान असताना सतर्कता बाळगावी. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. खराब हवामान असताना घरात रहावे, सुरक्षित रहावे, असे आवाहनही नितीश यांनी केले. बिहारमध्ये दरवर्षी विजा कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी होत असते.