मक्तेदारीविषयी मार्गदर्शक तत्त्वे अंमलात येणार
नवी दिल्ली, दि. 19 – आर्थिक केंद्रीकरण टाळण्यासाठी घटनेत ज्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे, त्यांची अंमलबजावणी करण्याचा जनता सरकारने निर्धार केला आहे. लोकसभेत कायदामंत्री शांतिभूषण यांनी ही घोषणा केली.
या दृष्टीने सरकारने एक उच्चाधिकार समिती नेमली आहे. मक्तेदारी व निर्बंधकारक व्यापार व्यवहारांबाबतचा जो कायदा आहे, त्याच्या कार्यवाहीचा ही समिती आढावा घेईल आणि संबंधित सूचनांच्या परिणामकारक बदल सुचवील.
आदिवासी मुलांना बोली भाषेतून शिक्षण
मुंबई – राज्यातील आदिवासी मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून मराठी शिकता यावे म्हणून आदिवासी बोलीभाषेचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून डिसेंबर 1977 अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री फारूक पाशा यांनी दिली.
भारत-जपान चर्चेची पहिली फेरी
नवी दिल्ली – भारत-जपान मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी जपानचे परराष्ट्रमंत्री इचिरी हाटोमाया आज येथे आले. वाजपेयी आणि हाटोयामा यांच्यादरम्यानचर्चेची पहिली फेरी पार पडली.