रायगड जिल्ह्यामध्ये खालापूरजवळील इर्शाळवाडी मध्ये माळीण घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. 17 हून अधिक घरांवर दरड कोसळली आहे. या ढिगाऱ्याखाली 50 पेक्षा अधिक लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अडथळे येत असून एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
बातमी अपडेट होत आहे