पुणे : राज्याचे राजकारण मागील एक महिन्यापासून पोटनिवडणुकाच्या भोवती फिरताना दिसले. दरम्यान, यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना ‘हू इज धंगेकर’ म्हणत हिणवले होते. मात्र तब्बल ३ दशकानंतर भाजपचा कसब्याचा गड महाविकास आघाडीने हिसकावून घेतला. यावर आता भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे, अशात पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे, त्या म्हणाल्या,’तिथल्या जनतेचा मुड पहिल्या दिवसापासून वेगळा होता. कसबा हारणं हे आमच्यासाठी वेदनादायी आहे.’ असंही त्या म्हणाल्या आहे.
नेमक्या काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
पहा निवडणुकीत जेव्हा एखादी विजय होतो. तेव्हा काय बरोबर झालं? याची चर्चा फारशी होत नाही. पण निवडणूक पराभूत झाल्यावर काय चुकलं याची चर्चा होते. ती झाली पाहिजे त्याच्यातून भविष्यामधल्या चुका आपण टाळू शकतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला असं वाटतं की तिथल्या जनतेचा जो मुड होता तिथल्या जनतेचा तो पहिल्याच दिवसापासनं हीच चर्चा होत होती की कसबा अवघड आहे. कसबा अवघड आहे, कसबा अवघड आहे ही चर्चा होती. कसबा हारणं हे आमच्यासाठी पण तेवढंच वेदनादायी आहे.