भारताने जम्मू-काश्मीरबाबत धडक निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानची अक्षरश: झोप उडाली आहे. त्यातून पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्या देशाचे नेते काहीही बरळू लागले आहेत.
पाकिस्तान सरकारने भारतीय राजदूतांना इस्लामाबादहून परत असून आपल्या राजदूतांनाही पाकिस्तानात परत बोलवले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. यामध्ये भारताशी राजनैतिक संबंध कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भारताशी व्यापारी संबंध कमी करणार असल्याचंही पाकिस्तानने जाहीर केलं आहे.
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवले. त्यामुळे काश्मीरवर वक्रदृष्टी असणाऱ्या पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्यातून काश्मीर स्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पाकिस्तानी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले.
Pak downgrades diplomatic relations with India, suspends bilateral trade
Read @ANI Story | https://t.co/teuoJq8SvL pic.twitter.com/zNQHt6UsSO
— ANI Digital (@ani_digital) August 7, 2019