कोलकाता – केंद्रीय तपास संस्थांसमोर आम्ही झुकणार नाही आणि धर्माच्या आधारावर निर्माण केल्या जाणाऱ्या कोणत्याही वैरभावनेला आमचा विरोध असेल अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली.
देशातील विविध समुदायांत द्वेष निर्माण करण्यासाठी पैसे खर्च केले जात आहेत. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधात डाव्या पक्षांचा आणि कॉंग्रेसचा वापर करून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता फक्त सहा महिने राहणार आहेत.
त्यांना त्या पदावरून हटवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळे आम्ही करू. मी इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडी सोबत आहे व आपल्या राज्यात एनआरसीला कधीच परवानगी देणार नाही असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.