अणे- बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील दगडू बांगर या शेतकऱ्याच्या तणनाशक फवारणीच्या पाण्याच्या ड्रममध्ये अज्ञात व्यक्तीने मीरा-71 हे विषारी औषध टाकल्याने या पाण्याने फवारणी केल्यामुळे दीड एकर कांद्याचे पीक जळून गेल आहे. यात दगडू बांगर या शेतकऱ्याचं 50 ते 60 हजार रुपयांचा नुकसान झाले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हा प्रकार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.