नवी दिल्ली – भारताने जम्मू-काश्मीरबाबत धडक निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानची अक्षरश: झोप उडाली आहे. त्यातून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्या देशाचे नेते काहीबाही बरळू लागले आहेत. इम्रान यांनी तर चक्क पुलवामासारखे हल्ले घडू शकतात, असे म्हणत भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवणारा इशाराही दिला. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल येथील जम्मू-काश्मीरमधील शोपियनमध्ये पोहोचले आहेत.
यावेळी डोवाल यांनी काश्मीरच्या खोऱ्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन शोपिया जिल्ह्यातील स्थानिक लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्यासोबत एकत्रित भोजन घेतले. तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांची आणि जवानांची देखील भेट घेतली.
Government Sources: NSA Ajit Doval visited Shopian which is a hotbed of militancy and was ground zero during Burhan Wani agitation. The region is now normal and peaceful #JammuAndKashmir pic.twitter.com/GBPt8bjUrp
— ANI (@ANI) August 7, 2019
सरकारच्या या निर्णयाला काश्मिरी जनतेचाही पाठिंबा आहे, असं या संवादातून माझ्या लक्षात आलं, असं अजित डोवाल म्हणाले आहेत .अजित डोवाल यांचा काश्मीरमधला एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे.
#WATCH Jammu and Kashmir: National Security Advisor Ajit Doval interacts with locals in Shopian, has lunch with them. pic.twitter.com/zPBNW1ZX9k
— ANI (@ANI) August 7, 2019
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येणाऱ्या नव्या प्रशासकीय रचनेत अधिकार आणि जबाबदाऱ्यांच्या वाटप प्रक्रियेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना काश्मीरला पाठवण्यात आले आहे.