नवी दिल्ली – ज्या लोकांना करोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांना लस देण्याची आवश्यकता नाही. असे एका रिपोर्ट द्वारे सांगण्यात आले आहे. या संदर्भात पब्लिक हेल्थ एक्सपर्ट्सच्या एक ग्रुपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका रिपोर्टमधून महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमोलॉजिस्ट्स आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रीवेंटिव अँड सोशल मेडिसिनच्या व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि कोविड-19 संबंधी राष्ट्रीय कार्यदलाच्या सदस्यांनी मिळून हा रिपोर्ट तयार केला आहे.
या पब्लिक हेल्थ एक्सपर्ट्स ग्रुपच्या म्हणण्यानुसार, मोठ्या प्रमाणात सरसकट लसीकरण करण्यापेक्षा केवळ संवेदनशील आणि जोखिम श्रेणीमध्ये येणाऱ्या लोकांचेच लसीकरण करावे. देशातील सध्याची स्थिती पाहता, तरुणांना सरसकट लसीकरण सुरु करण्याऐवजी संवेदनशील आणि जोखिम श्रेणी लोकांना लस देण्यास प्राधान्य द्वावे. असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.
कमी वयांच्या लोकांमध्ये आणि लहान मुलांचे लसीकरण करणे समर्थणीय आणि फायदेशीर नाही. अनियोजित लसीकरणामुळे विषाणूच्या उत्परिवर्तित स्वरुपाच्या वाढीस चालना मिळू शकते. त्यामुळे ज्या लोकांना करोना विषाणूची लागण होऊन गेली आहे, त्यांना सध्या लसीकरणाची आवश्यकता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पब्लिक हेल्थ एक्सपर्ट्सच्या या रिपोर्टवर केंद्र सरकारकडून कोणता निर्णय घेतला जाणार यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.