नवी दिल्ली – संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सांगितले की, ‘मी स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे आणि या वर्गाला भेडसावणाऱ्या समस्या जाणून आहेत त्यामुळे मला मी सुद्धा मध्यम वर्गी यांना समजून घेते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मासिक ‘पांचजन्य’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी सीतारामन बोलत होत्या.
Delhi| I belong to middle class & identify myself as middle class so I can understand them. Modi govt has not levied any new tax on middle class in any budget so far. No tax levied on people who earn salary up to Rs 5 Lakhs: Nirmala Sitharaman, Finance Minister (15/01) pic.twitter.com/SGu8KF1uW4
— ANI (@ANI) January 16, 2023
अर्थमंत्री म्हणाले की,’मी मध्यमवर्गीय आहे, आणि माझी ओळख मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे मी त्यांना समजू शकतो. त्या पुढे म्हणाल्या की, सध्याच्या सरकारने वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांवर कोणताही नवीन कर लादलेला नाही. केंद्रीय मंत्र्यांनी असेही सांगितले की केंद्राने मध्यमवर्गीयांच्या समस्येवर लक्ष देताना स्मार्ट शहरे तयार करणे, राहणीमान सुलभतेला प्रोत्साहन देणे आणि मेट्रो रेल्वे नेटवर्क विकसित करणे यासारख्या अनेक उपाययोजना केल्या आहेत.’
सीतारामन म्हणाल्या की, ‘मोदी सरकारने आतापर्यंत कोणत्याही अर्थसंकल्पात मध्यमवर्गावर कोणताही नवीन कर लादलेला नाही. 5 लाख रुपयांपर्यंत (वार्षिक) पगार मिळवणाऱ्या लोकांवर कोणताही कर आकारला जात नाही.’
मोदी सरकार 4R वर काम करत आहे
मोदी सरकार 4R- 4R- Reduce, Resolve, Recapitalise, Reform यावर काम करत आहे. राजकीय पक्षांनी त्यांच्या अर्थसंकल्पात मोफत सुविधा देण्याचे आश्वासन द्यावे, असेही त्या म्हणाल्या आहे.