नि:स्वार्थ, नि:स्पृह भावनेने काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाजातील असमतोलाची दरी काही अंशी कमी होताना दिसते. माणसाला माणसं जोड असतानाच, समाजमन आणि समाजभान जपणारे असेच एक सामाजिक कार्यकर्ते अजातशत्रू व्यक्तीमत्त्व आणि माणूसवेडा ‘माणूस’ म्हणजे अँड. दिलीप जगताप होय.
अँड. दिलीप जगताप यांच्याशी माझे मित्रत्वापलीकडचे दृढ स्नेहाचे नाते आहे. आमच्या प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
अँड, दिलीप जगताप यांच्या यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने त्यांचा जीवनपट उलगडून दाखविण्याचा अल्पसा प्रयत्न..!
माणुसकी जपणारा अवलिया !
परिस्थितीचे चटके ज्यांनी सोसलेले असतात त्यांच्या पायाखालची जमीन सहसा सुटत नाही. अशी माणसं पद, प्रसिद्धी, पैसा यांच्यापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देतात. माणसं जपतात. सहृदयता हा ज्यांच्या जगण्याचा निखळ स्वभाव बनलेला असतो अशी माणसं आपल्या भोवताली अनेक चांगल्या माणसांना जोडत राहतात आणि चांगल्या कामाचा वसा पुढे नेत राहतात. या सगळ्याचं एक मूर्तीमंत असं उदाहरण म्हणजे अॅड. दिलीप जगताप.
सद्यस्थितीत संवेदनशील परिस्थितीत माणुस माणसापांसुन दुर जात असताना व प्रत्येक जण स्वतःचाच विचार करण्यात व्यस्त असताना आपल्यातल्याच एका सभ्य व्यक्तीमहत्व म्हणून क्षणभरासाठी का होईन अँड. दिलीप जगताप यांची आठवण मला आल्याशिवाय राहत नाही.
सामाजिक उपक्रम आणि अँड. दिलीप जगताप असे जणू समिकरणच बनले आहे. हे अँड जगताप यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांमधून दिसून येत आहे. अँड. जगताप यांनी दक्षिण उपनगरामध्ये सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जनहित फौंडेशनचे अध्यक्ष, सावंत विहार सोसायटीचे अध्यक्ष, अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था व सिद्धीविनायक ग्रुप कात्रज अशा संस्थांना कायदेशीर सल्लागार म्हणून अँड जगताप अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि सल्लानुसार अनेक सोसायटी मधील सभासद एकत्रितपणे प्रत्येक सण आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करतात, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, गरजूंना मदत, ममता फौंडेशनमधील एचआयव्ही ग्रस्त मुलांना मदत असे अनेक उपक्रम अँड दिलीप जगताप यांनी आजपर्यंत राबविले आहेत.
आमचा रेणुसे परिवार आणि चिंतामणी ज्ञानपीठातर्फे मी त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी एवढेच म्हणू इच्छितो, ‘ तुम जियो हजारो साल | हर साल के दिन हो पचासो हजार |’
– विजय उर्फ आप्पासाहेब रेणुसे, (संस्थापक अध्यक्ष,- चिंतामणी ज्ञानपीठ)