नवी दिल्ली – जंतर मंतरवर जातिवाचक घोषणाबाजी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह सहा जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतील जंतर – मंतर येथे ८ ऑगस्ट रोजी निदर्शनादरम्यान हा प्रकार घडला आहे.
दिल्लीत जंतर -मंतरवर भारत जोडो आंदोलनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलना दरम्यान जातीय घोषणाबाजी केल्या गेल्या होत्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
यावर आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले,’या गुंडाच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय? यांना माहीत आहे, की मोदी सरकार यांच्या पाठीशी उभे आहे.’ असा म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी या मुद्यावर वरून ट्विटही केले होते आहे की,’ काही दिवसांपूर्वी द्वारका येथे हज हाऊसविरोधात एक ‘महापंचायत’ बोलावण्यात आली. हस्ब-ए-रिवायत, या पंचायतीतही मुस्लीम विरोधी घोषणा देण्यात आल्या. जंतर मंतर मोदींच्या महालापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. काल तेथे ‘जब मुल्ले काटे जाएंगे..’ सारख्या वाईट घोषणा देण्यात आल्या.” असं म्हणत त्यांनी या मुद्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.