सातारा – वाई तालुक्यात लागलेल्या निकालामध्ये आमदार मकरंद पाटील यांची जादू बोपर्डी, किकली, गोवेदिगर, पांडे, कवठे या सहा गावात कायम राहिली आहे . तर भुईंजमध्ये मदनदादा भोसले यांच्या गटाला सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले आहे. विजयी झालेल्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला . वाई तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही गटामध्ये चुरशीने मतदान झाले होते. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद आबा आणि वाईचे माजी आमदार मदनदादा यांच्या नेतृत्वाखाली पॅनल गावागावांमध्ये एकमेकांविरोधात लढत होती
निवडणूक निकालाच्या दिवशी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया सकाळी सुरू केली. एक एक निकाल हाती येतात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पराभूत झालेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी लगेच तेथून काढता पाय घेतला मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विजयी झाल्याचे समजतात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. विशेष करून भुईंज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष होते. भुईंजमध्ये ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात राहावी यासाठी माजी आमदार मदन दादा भोसले यांनी कष्ट घेतले होते .भाजपचे युवा कार्यकर्ते ईशान भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक भाजप लढवत होते. त्यामध्ये त्यांना नऊ जागावर यश मिळवता आले राष्ट्रवादीने ही चांगलीच टक्कर दिली. सहा जागा मिळवता आल्या.
बोपर्डी या गावांमध्ये निवडणूक अतिशय अटीतटीची मानली गेली होती. युवानेते तेजस गाढवे यांनी पॅनल टाकले होते तर राष्ट्रवादीचे शंकरराव गाढवे यांनी पॅनल टाकले होते. दोन्हीही पॅनलवर आमदार मकरंद आबा यांचे फोटो झळकत होते. तेजस गाढवे यांच्या पॅनलमध्ये सर्व नवखे उमेदवार होते. प्रथमच ते निवडणूक लढवत होते तर शंकराव गाढवे यांच्या पॅनलमध्ये अनुभवी असे सदस्य व स्वतः शंकराव गाढवे हे लढत देत होते. आमदार मकरंद आबा यांच्याकडून केलेल्या कामाचा अजेंडा त्यांनी गावाच्या प्रचारा वेळी वापरल पण मतदारांनी ही शंकराव गाढवे यांच्या बाजूने कौल दिला.
त्यांना दहा जागांवर विजय मिळवता आला. पांडे या गावांमध्ये राष्ट्रवादीने सत्ता राखली. काळंगवाडी, गोवेदिगर येथेही राष्ट्रवादीचेच प्राबल्य राहिले एकूणच वाई तालुक्यात घड्याळाचाच गजर ऐकू आला. तर भाजपला केवळ भुईंजमध्ये समाधान मानावे लागले. कवठे गावात राष्ट्रवादीचेच दोन पॅनल होते. सत्यजित वीर व संदीप पोळ यांच्या पॅनेलच्या 4 तर सर्व पक्षीय पॅनलच्या 7 जागा विजयी झाल्या.
भुईंज-भाजप 9, राष्ट्रवादी 6, गोवेदिगर-राष्ट्रवादी 5, इतर 3, पांडे-राष्ट्रवादी 9, इतर 1, बोपर्डी-राष्ट्रवादी 10, इतर 0, काळंगवाडी-राष्ट्रवादी 5, इतर 3, किकली-राष्ट्रवादी 8, इतर 2, कवठे- राष्ट्रवादी एक गट 4, राष्ट्रवादी व सर्वपक्षीय 7.