पिंपरी – उद्योगनगरी म्हणून प्रचलित असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या उद्योगांना सध्या कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागत आहेत. एकीकडे महागलेला कच्चा माल तर दुसरीकडे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पर्यायी इंधनावर होणारा खर्च, वेळेत काम पूर्ण होत नसल्याने होणारे नुकसान यामुळे उद्योगनगरीला रोज सुमारे 50 कोटींचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावर्षी कोणतीही जाहिरातबाजी, पत्रकबाजी न करता अचानकपणे पाऊले उचलत वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जन होऊ दिले नाही. महापालिका प्रशासनाच्या या कौतुकास्पद उपाययोजनेमुळे नक्कीच नद्यांच्या प्रदुषणात वाढ झाली नाही. एकीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पर्यावरणप्रेमी कौतुक करत आहेत तर दुसरीकडे नदीमध्ये थेट मिसळणारे सांडपाणी रोखण्याची सद्बुद्धी महापालिकेला देत असे साकडे गणरायाला घालत आहेत.
आजही नदीमध्ये थेट ड्रेनेजलाइनचे पाणी मिसळत आहे. ते थांबविण्यात अद्यापही प्रशासनास यश आले नाही. ते ड्रेनेजचे नदीत जाणारे पाणी थांबविण्याची सुबुद्धी देवा गणराया महापालिकेला दे, अशी विनवणी पर्यावरण प्रेमी करीत आहेत. पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या शहरातून वाहतात. या नद्यांनीच एकेकाळी हा परिसर सुजलाम-सुफलाम बनविला होता. परंतु आता आता शहराला जलसमृद्ध मानायचे काही कारण नाही.
नद्या कधी प्रदूषणमुक्त होणार?
सध्या तरी केवळ पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा हा केवळ पवना नदीतून होत आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्या अतिशय प्रदूषित झाल्या आहेत. वारंवार वाढणाऱ्या जलपर्णी हे त्याचेच प्रतीक आहे. या जलपर्णीमुळे जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. अनेकदा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेले मासे पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत प्रवेश करताच मरण पावतात होतात. अनेकदा मृत माशांचा खच ठिक-ठिकाणी आढळला आहे. पवना नदीच्या वाढणाऱ्या प्रदुषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला जबाबदार धरत दंडही केला आहे. नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सरकारी उत्तर महापालिका देत आहे.
रसायनमिश्रित पाणीही नदीत
पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. येथील अनेक कंपन्यांमधून रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी थेट नाल्यांमध्ये सोडले जाते. अशा कंपन्यांसाठी रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची घोषणा महापालिकेने केली. मात्र गेल्या दहा वर्षात काहीच कार्यवाही झालेली नाही. सध्या नदीच्या दोन्ही बाजूला ड्रेनेजची लाइन टाकण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यातून 100 टक्के नदीत जाणारे ड्रेनेजलाइनचे पाणी थांबविण्यात महापालिकेला यश येईल, असा दावा केला जात आहे.
काही घाटांवर शंभर टक्के मूर्तिदान
महापालिकने नदीकडे जाण्यासाठी असलेला रस्ताच बंद केल्याने पिंपरी चिंचवड आणि इतर काही घाटांवर 100 टक्के मूर्तीदान झाले. मात्र काही ठिकाणी होड्यांची व्यवस्था राजकीय नेत्यांनी केली होती. तिथे मात्र भक्तांनी वाहत्या पाण्यातच गणेश मूर्तीचे विसर्जन केले. निर्माल्य आणि गणेश मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे नदी प्रदूषण टळले, हे वास्तव असले तरी इतर मार्गाने होणारे नदी प्रदूषण रोखण्याची सद्बुद्धी महापालिकेला गणरायाने द्यावी, अशी प्रार्थना पर्यावरण प्रेमी करीत आहेत.