औंध : मराठा समाज बांधवांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण,सोमेश्वर वाडी, सूस, महाळुंगे परिसरातील सर्व समाजाच्या बांधवांनी एकत्रित येऊन मराठा समाजाच्या बांधवांना आरक्षण मिळावे, अशी मागणी केली.
यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिसरातील गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज दिवाळी साजरी करणार नाही. आरक्षणासाठी जीव गमावलेल्या बांधवांचा विचार करून तसेच मनोज जरंगे पाटील आरमरण उपोषण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाज दिवाळी साजरी करणार नाही, असे जाहीर करण्यात आले.
सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस, महाळुंगे, बोपोडी, बावधन,बहिरटवाडी, खैरेवाडी, गोखले नगर, जनवाडी, मॉडेल कॉलनी, भोसले नगर, वाकडेवाडी, मुळा रोड, पाटील इस्टेट भैया वाडी, छत्रपती शिवाजी महाराज नगर, रेल्वे झोपडपट्टी संगमवाडी, भोसले वाडी, पाटकर प्लॉट वडारवाडी, पांडवनगर, संपुर्ण छत्रपती शिवाजी महाराज नगर भाग, पीएमसी कॉलनी आदी परिसरातील मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे बांधव, महिला भगिनी तसेच परिसरातील सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते.