Maratha reservation – मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीला धक्कादायक वळण लागले आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मुंबईत एका 45 वर्षीय व्यक्तिने भर रस्त्यावर गळफास घेत आत्महत्या (suicide) केली. सुनील कावळे (sunil kavale) असे त्याचे नाव आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पुलाच्या खांबाला गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले. जालन्यातील मराठा आंदोलनात सुनील कावळे हा सक्रीय होता, अशी माहिती आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली.
सुनील कावळेंनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange Patil) पत्र लिहिली आहे. सुनील कावळेंचे मृत्यूपूर्व पत्र लिहिले आहे. “मराठा आरक्षण, मगच इलेक्शन’ असा इशारा सुसाईड नोटमधून देण्यात आला आहे. या पत्रात त्यांनी 24 ऑक्टोबरला मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
तसेच पत्राच्या शेवटी माफी देखील मागितली आहे. दरम्यान, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.
लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही.
यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मनोज जरांगे पाटील काय म्हणतात पाहा….
“सुनील कवळे यांनी आत्महत्या केल्याचे कळाले. सरकारने आमचे बळी घेण्याचे ठरवले का? हे कळत नाही. या सरकारमुळेच हे बळी पडत आहे. सरकारला आमचे किती मुद्दे पाडायचे हे समजत नाही. आमच्याच या परिवारातीलच तो तरुण होता.
आता तरी सरकारने त्या तरुणाचे बलीदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने आता तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा. अन्यथा 24 तारखेनंतर होणारे शांततेचे आंदोलन सरकारला परवडणार नाही’. असं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील म्हणाले.