Lawyer Gunaratna Sadavarte – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 तारखेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात केली. त्यांच्या या आमरण उपोषणाला मोठ्या प्रमाणात राज्यातील मराठा समाजातील लोकांनाच पाठिंबा आहे. अशात त्यांच्या या उपोषणाला आणि मराठा आरक्षणाबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध दिसून आला. अशात आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या काही व्यक्तींनी फोडल्याची माहिती समोर आली आहे.
अशात या घटनेवर वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचाय. हीच तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे का? मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही असं म्हणत निशाणा साधला आहे.’
त्यांच्या या प्रतिक्रियेवर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनोज जरांगे म्हणाले,’आमचा समाज शांततेच आहे. सगळे मराठा समाजाच्या विरोधात जात आहेत. या समाजाचं वाटोळं व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. आमच्या जातीच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. पण आम्ही तरीही शांत आहोत. आंदोलन शांततेत चालू आहे, शांततेत चालू राहील. कुठेही उद्रेक करण्याचा उद्देश मराठा समाजाचा नाही.’ असं म्हणत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.