Manoj Jarange : राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली डेडलाईन उद्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे. त्यापूर्वी आज 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) सभा आयोजित करण्यात आली आहे.
बीड येथील सोलापूर- धुळे महामार्गावरील पाटील मैदानात जाहीर सभा होत आहे. अल्टीमेटम संपण्यापूर्वीची ही शेवटची सभा असल्याने निर्णायक इशारा सभा असे नाव देण्यात आले आहे. या सभेला बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहिले असून, मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे. आपल्या भाषणात बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे –
मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणारच. मराठा समाज आणि माझं नातं हे माय-लेकाचं आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पीढीला आरक्षण मिळवून देणार. या आधीच्या पीढीचे आयुष्य आरक्षणाविना उद्ध्वस्त झालं. आता मराठा जागा झाला आहे.
देव जरी आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणार –
देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, आपण तेच घेणार असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांनी यांनी मोठं करायचं आणि मराठ्यांचे मुडदे पडत असताना यांनी त्याकडे पाहायचं नाही,
आता तसं करायचं नाही. सरकार गांभिर्याने घेत नाही, पण आता त्यांना वठणीवर आणण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे असं मनोज जरांगे म्हणाले.