नवी दिल्ली- मणिपूरमध्ये जे घडले ते संपूर्ण देशाला अतिशय लज्जास्पद आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ते त्यांच्या राज्यातील माता आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी नेहमीच सतर्क राहावे. या घटनेबाबत मी तुम्हाला खात्री देतो की, जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. मणिपूरमध्ये महिलांबाबत जे घडले ते कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी योग्य नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या व्हिडिओ प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी म्हणाले की, या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही राज्य सरकारमध्ये, राजकारण आणि वादविवादाच्या पलिकडे, कायदा आणि सुव्यवस्थेचे महत्त्व असून देशातील महिलांना सर्वोच्च आदर आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, या किंवा अशा प्रकरणातील कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही.
कायदा पूर्ण ताकदीनिशी आणि काटेकोरपणे कारवाई करेल. मणिपूरच्या ज्या मुलींबाबत हे झाले, त्या पीडितांना न्याय दिला जाईलच पण ज्यांनी हे कृत्य केले त्यांना कधीही माफ केले जाणार नाही. मी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचे आवाहन करतो. आपल्या माता-भगिनींच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजेत.