मुंबई – राज्यात थंडीचा काकडा कमी होताना दिसत आहे. आपल्या ग्रामीण भागात होळी(शिमग्या) पर्यंत थंडी असते. मात्र अलीकडच्या काळात काही हवामानात बदल होत असून तापमानात वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही तापमानात वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 30 अंशाच्या पुढे गेला आहे..अनेक जिल्ह्यात ताापानाचा पारा 30 अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, सांगली, परभणी, पुणे, जळगाव, अमरावती. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीला सिक्कीम, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, वायव्य भारतातील बहुतांश भागात तापमानात किंचित वाढ जाणवू शकते, असेही हवामान विभगाने सांगितले आहे.
हिमाचलमधील हवामान
हिमाचलमधील अनेक भागात काल म्हणजेच रविवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यातील आठ मध्य आणि उंच पर्वतीय जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते. पावसाच्या शक्यतेमुळे, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.