Maharashtra Weather । राज्यात मागील काही दिवसांपासून सकाळी थंडीचा जोर जास्त वाढल्याचे दिसत आहे. मात्र आता राज्यातील हवामानात मोठा बदल जाणवणार असल्याचे सांगण्यात येतंय. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आगामी ४ ते ५ दिवसांत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवलीय.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येणाऱ्या दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होणार आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानात बदल होत असून आता रात्री थंडी, दिवसा उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे.
पुढील 24 तासांत महाराष्ट्रात हवामान कोरडे Maharashtra Weather ।
पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात पुढील 24 तासांत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहर आणि उपनगरात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35अंश सेल्सिअस आणि 21 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद Maharashtra Weather ।
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नाशिक, जळगाव आणि मोहोळ येथे 14. 9 अंश सेल्सिअसच्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे 38.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, काल राजधानी दिल्लीत थंडी होती, किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा पाच अंश सेल्सिअस कमी आहे. पुढील काही दिवस दिल्ली आणि आसपासच्या शहरात अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.