मध्य प्रदेश – खरगोनहून इंदौरला जाणाऱ्या प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी पुलाचा संरक्षण कठडा तोडून 50 फूट उंचावरुन ही बस नदीमध्ये कोसळली. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
हा अपघात खरगोन ठिकरी मार्गावर झाला आहे. बस नदीच्या पुलावरून जात असताना नियंत्रण सुटल्याने बस रेलिंगवर आदळली. तेव्हा रेलिंग तोडून बस नदीत कोसळली. या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
Madhya Pradesh | 15 people dead and 25 injured after a bus falls from a bridge in Khargone. Rescue operation underway: Dharam Veer Singh, SP Khargone pic.twitter.com/X66l8Vt7iT
— ANI (@ANI) May 9, 2023
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी शिवराज सिंह वर्मा आणि खरगोनचे आमदार रवी जोशी हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. तर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.