चिंबळी- करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र, या काळात जीवनावश्यक सेवा सुरू असल्याने काहीकाळ नागरिकांना रस्त्यावर फिरण्याची मुभा मिळत असल्याने काही महाभाग याचा गैरफायदा घेत विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने केळगाव (ता. खेड) येथे विषाणुचा प्रादुर्भाव पसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सोमवार (दि. 13) व मंगळवारी (दि. 14) गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. तर चिंबळी व आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लाऊन ते सील करण्यात आले होते. त्याचप्रमाणे चिंबळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीनेही मंगळवार (दि. 15) पासून तीन दिवस बंद पाळण्यात येणार आहेत. याकाळात फक्त मेडिकल व दावाखाने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.