वडगाव, (वार्ताहर) – गेल्या पाच वर्षांत कासारसाई धरण परिसरात कृषी पर्यटन ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वाढीस लागली. गुडफ्रायडे, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्यांमुळे कासारसाई धरणावर पर्यटकांची रविवारी (ता. ३१) मोठी गर्दी झाली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने नागरिकांना धरण परिसरात काहीसा गारवा अनुभवलाय बारावी, दहावीची परीक्षा संपली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. तर, गुड फ्रायडे, शनिवार, रविवार सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने पालकांनी सुटीला जोडून आलेली, शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने पिंपरी चिंचवड शहर, मावळ परिसरासह पुणे-मुंबईसह इतर शहरी भागातील पर्यटकांची गर्दी झाली होती. गेल्या पाच वर्षांत कासारसाई धरण परिसरात कृषी पर्यटन ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वाढीस लागली.
याच कृषी पर्यटन केंद्रात माफक खर्चात दिवसाला शेकडो पर्यटकांना सहज पर्यटनाचा आनंद घेता येईल, अशा मोठ्या स्वरूपात कृषी पर्यटन केंद्राची बांधणी व्यावसायिकांनी केल्याने पर्यटकांची सर्वाधिक पसंती कासारसाई धरण परिसराला मिळत आहे.
उन्हाळ्यात सुटीच्या दिवशी कासारसाई धरण परिसरात वाढणारी पर्यटकांची संख्या व उन्हाची वाढलेली तीव्रता विचारात घेऊन धरणात पोहण्याचा मोह न आवारणाऱ्या पर्यटकांचा विचार करून कोणाताही अपघात होऊ नये, तसेच पर्यटकांनी कोणत्याही परिस्थितीत पाण्यात उतरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.