मुंबई – दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) अज्ञात हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून अनेक बाॅलिवूड कलाकारांनी याचा निषेध केला आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सुद्धा काल संध्याकाळी जेएनयू मध्ये दाखल झाली होती. तसेच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील ट्विटरच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, आता या प्रकरणात अभिनेत्री आलिया भट्ट हिने सुद्धा उडी मारली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आलिया व्यक्त झाली आहे. आलिया म्हणाली कि, ‘जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी आपला निषेध नोंदवला आहे. जेव्हा शिक्षक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक हल्ल्याचे बळी ठरतात, तेव्हा देशात सर्वकाही ठिक आहे असं भासवणं आपण बंद केलं पाहिजे, असं ती म्हणाली आहे.
‘आपल्याला डोळ्यासमोरील सत्याला सामोरं जावं लागेल, आपल्याच घरात अशांतता आहे हे मान्य करावं लागेल. आपली विचारसरणी एकमेकांपासून कितीही भिन्न असली तरी आपण एकत्र येऊव यावर तोडगा काढला पाहिजे. तसेच ज्या आदर्श तत्वांवर हा देश आधारला आहे ते पुन्हा अंमलात आणले पाहिजे’. असं सुद्धा आलिया म्हणाली.