कोलकाता – गुरूदेव रविंदनाथ टागोर यांनी जन गण मन हे राष्ट्रगीत लिहीले त्या गितामुळे संपुर्ण भारतीयांना एकत्र बांधून ठेवले आहे असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. 1911 साली याच दिवशी रविंद्रनाथांनी लिहीलेले हे गीत पहिल्यांदा गायले गेले होते. त्यानिमीत्त ममतांनी त्यांचे स्मरण केले आहे. ब्रिटीशांना 1905 मध्ये बंगालची फाळणी केली होती त्याच्या निषेधार्थ गुरूदेव टागोर यांनी आमार सोनाल बांगला लिहीले होते याचीही आठवण त्यांनी यानिमीत्त करून दिली आहे.
टागोर यांनी बंगालच्या फाळणीचा विरोध ज्या प्रकारे केला त्यातून लोकांना मार्गदर्शन झाले. 1911 साली याच दिवशी कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात प्रथम जन गण मन हे गीत गायले गेले. पुढे ते आपले राष्ट्रगीत झाले. या गीताने आपल्याला एकत्र बांधून ठेवले आपल्यात राष्ट्रभावना जागृत ठेवली.24 जानेवारी 1950 ला आपल्या घटनासभेने हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. 1971 मध्ये टागोर यांचे आमार सोनार बांगला हे गीत बांगलादेशने 1971 साली आपले राष्ट्रगीत घोषित केले. आज देश नष्ट करायला निघालेल्या राज्यकर्त्यांच्या विरोधात मान तुकवायची नाही अशी प्रेरणाही आपल्याला त्यांच्यामुळेच मिळते आहे असेही ममतांनी नमूद केले आहे.