जालना – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी 25 टन रेल्वेच्या बोगिची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोसंबी, सीताफळ, द्राक्षे, डाळिंब हे दिल्ली, राजकोट, सुरत, अमृतसर या ठिकाणी पाठवता येत आहेत. या सुवेधेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून शेतमालाला दपट-तिपटीने भाव मिळत आहे.
आज याचा प्रारंभ झाला. सचखंड एक्सप्रेस ने जालन्यातील मोसंबी दिल्लीकडे पाठवण्यात आली. जालना जिल्हा मोसंबीच्या उत्पादनासाठी अग्रेसर असून जिल्ह्यातील मोसंबी आता राज्याबाहेरील बाजार पेठेत जाऊ लागल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.