नवी दिल्ली – जेईई अॅडवान्स 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत जयपूरच्या मृदूल अग्रवालने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये दिल्ली झोन मधून काव्या चोप्रा या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक आला आहे. मृदूलने आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षेत 360 पैकी 348 गुण मिळवून आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्याची टक्केवारी 96.66 इतकी आहे. 2011 नंतर हे कुठल्याही विद्यार्थ्याने मिळवलेले सर्वाधिक गुण आहेत.
निकालात देशभरातून 41, 862 विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत. मुंबईचा कार्तिक नायर हा विद्यार्थी देशातून सातवा आणि राज्यातून पहिला आला आहे तर निरिजा पाटील ही मुंबई झोन मुलींमध्ये पहिली आली आहे.
दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए) कडून जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर करण्यात आला. आता जेईई अॅडवान्सचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला अॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे. एनटीएकडून बीटेकचे निकाल आधीच जाहीर करण्यात आले आहेत.