Ishan Kishan, IND vs SA Test Series : गेल्या रविवारी (17 डिसेंबर) BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला ब्रेक देण्याची आणि केएस भरतचा संघात समावेश करण्याबाबत माहिती दिली. बीसीसीआयने असेही सांगितले की, इशान किशनने वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेतून ब्रेक मागितला होता. मात्र, आता एका रिपोर्टमध्ये इशान किशनच्या निर्णयामागचं एक मोठं कारण समोर आलं आहे.
एका प्रसिध्द वृत्तपत्राच्या सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, इशान किशनने संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की तो मानसिकदृष्ट्या थकलेला आहे आणि त्याला काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा आहे. सर्वांनी त्याच्याशी सहमती दर्शवली.
मानसिक थकवा येण्याचे कारण काय?
इशान किशनच्या मानसिक थकवा येण्याच्या मागचे कारण समजून घेतल्यास संपूर्ण प्रकरण स्पष्ट होते. वास्तविक, ईशान गेल्या एक वर्षापासून टीम इंडियाच्या जवळपास प्रत्येक संघाचा भाग आहे. तो संघासोबत भारतात आणि भारताबाहेर प्रवास करत राहिला. यादरम्यान, मॅच सराव असो किंवा सराव सत्र असो किंवा प्लेइंग-11 मध्ये संधी मिळण्याची त्याची पाळी असो, तो सदैव तयार राहिला होता. पण या काळात एक-दोन खेळाडू काही कारणास्तव संघाबाहेर राहिले तेव्हाच त्याला संधी मिळाली. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी सामन्याची तयारी करणे आणि नंतर बेंचवर बसणे हे देखील मानसिक थकवाचे कारण बनू शकते.
दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतही बेंचवर बसण्याचं होत निश्चित…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी होती. अशा स्थितीत यावेळीही तो पूर्ण तयारीनिशी फक्त बाकावर बसून राहिला असता. कदाचित त्यामुळेच ईशानने बीसीसीआयला या कसोटी मालिकेतून विश्रांती देण्याची विनंती केली होती.