IPL 2026 Playoffs : प्ले-ऑफ अन् फायनलमध्ये पाऊस पडला तर विजेता कसा ठरणार? सुपर ओव्हर की पॉईंट्स टेबल? जाणून घ्या नियम
IPL 2026 Playoffs : जर प्ले-ऑफ किंवा फायनल सामन्यात पावसाने खोडा घातला आणि सामना रद्द करावा लागला, तर नेमका कोणता संघ पुढे जाणार आणि ट्रॉफी कोणाला मिळणार?

IPL 2026 Playoffs Rain Rules : आयपीएल २०२६ (IPL2026) च्या प्ले-ऑफचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. ‘क्वालिफायर १’ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत, तर ‘एलिमिनेटर’ सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार लढत होणार आहे. मात्र, सध्या देशातील विविध भागांमध्ये पावसाचे सावट असल्याने क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच मोठी शंका निर्माण झाली आहे. जर प्ले-ऑफ किंवा फायनल सामन्यात पावसाने खोडा घातला आणि सामना रद्द करावा लागला, तर नेमका कोणता संघ पुढे जाणार आणि ट्रॉफी कोणाला मिळणार? याबाबत आयपीएलचे नियम काय सांगतात, ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
फायनल वगळता इतर सामन्यांना ‘रिझर्व्ह डे’ नाही! (IPL 2026 Playoffs)
आयपीएलच्या (IPL) नियम क्रमांक १३.७.३ नुसार, प्ले-ऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवसाची (रिझर्व्ह डे) तरतूद असली, तरी आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी स्वतंत्र राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. यंदाही केवळ १ जून रोजी होणाऱ्या अंतिम (फायनल) सामन्यासाठीच एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
बाकीच्या प्ले-ऑफ सामन्यांसाठी अतिरिक्त वेळेची तरतूद असेल. पाऊस पडल्यास डकवर्थ-लुईस नियमानुसार किंवा किमान ५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर तितकाही वेळ मिळाला नाही, तर सामना अधिकृतपणे रद्द केला जातो.
It’s Playoffs time, folks 😎
Comment your early prediction for the winner 👇🏆 #TATAIPL | #TheFinalLeap | #Qualifier1 | #Eliminator pic.twitter.com/cT0Y2Ri3T6
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2026
पावसामुळे सामना रद्द झाल्यास पॉईंट्स टेबल ठरणार ‘किंग’! (IPL 2026 Playoffs)

IPL 2026 Playoffs : प्ले-ऑफ अन् फायनलमध्ये पाऊस पडला तर विजेता कसा ठरणार? सुपर ओव्हर की पॉईंट्स टेबल? जाणून घ्या नियम
जर क्वालिफायर किंवा एलिमिनेटर सामना पावसामुळे पूर्णपणे रद्द झाला, तर विजेत्याचा निर्णय हा थेट पॉईंट्स टेबलमधील स्थानावरून केला जाईल. नियमानुसार, गुणतालिकेत जो संघ आपल्या विरोधी संघापेक्षा वरच्या स्थानावर असेल, त्यालाच थेट विजेता घोषित करून पुढील फेरीत प्रवेश दिला जाईल. जर दोन संघांचे गुण समान असतील, तर ‘नेट रनरेट’ ज्याचा सरस आहे, तो संघ विजेता ठरेल.
हेही वाचा – Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार जाहीर
या नियमानुसार, आरसीबी आणि गुजरात यांच्यातील क्वालिफायर १ रद्द झाल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या आरसीबीला फायदा होईल. तर हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील एलिमिनेटर सामना रद्द झाल्यास तिसऱ्या क्रमांकावरील हैदराबादचा संघ थेट क्वालिफायर २ मध्ये पोहोचेल. यापूर्वी २०२३ मध्ये चेन्नई आणि गुजरात यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात आला होता. यंदाही फायनलसाठी १ जून हा दिवस राखीव असेल, पण त्या दिवशीही पाऊस पडल्यास अंतिम विजेतेपदाचा निर्णय कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष असेल.





