Shreyas Iyer Statement : “आमच्याकडून चुका होणारच…!”, सलग ५ व्या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस संतापला; कोणारवर फोडलं पराभवाच खापर?
Shreyas Iyer Statement : ऐतिहासिक पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने परिषदेत केलेल्या विधानामुळे आता क्रिकेट वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Shreyas Iyer Statement on India humiliating loss : कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघासाठी इंग्लंडचा दौरा अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणा ठरला आहे. चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. या दारुण पराभवामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. भारताच्या १२ वर्षांच्या टी-२० इतिहासात इंग्लंडविरुद्ध मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने परिषदेत केलेल्या विधानामुळे आता क्रिकेट वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
“आम्ही अंमलबजावणीत कमी पडलो…!” – श्रेयसची नाराजी
🎙️ Anchor: How do you assess today’s performance?
Shreyas Iyer: Disappointing. 158 was never an ideal total, and they chased it down comfortably.
🎙️ Anchor: After the previous defeat, what was the message to the bowlers?
Shreyas Iyer: We wanted to keep hitting the right… pic.twitter.com/LXutSFjmu2
— Sunil Gavaskar (@virender_swag) July 9, 2026
सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “पुन्हा एकदा निराशाच पदरी पडली. ब्रिस्टलच्या खेळपट्टीवर १५८ धावा ही समाधानकारक धावसंख्या नव्हती. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी किती सहज लक्ष्य गाठले, ते आपण पाहिलेच. मी गोलंदाजांना मधल्या आणि लेग स्टंपच्या लाईनवर योग्य टप्प्यात गोलंदाजी करायला सांगितली होती, तिथे धावा करणे सोपे नव्हते. मात्र, आम्ही रणनीतीचे अंमलबजावणी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो. जेव्हा जेव्हा आमच्या गोलंदाजांनी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा साधारण चेंडू टाकले गेले आणि प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा फायदा घेतला.”
वैयक्तिक ८० धावांवर श्रेयस काय म्हणाला?
Shreyas Iyer:- I’m happy with my performance 🤬🤬🤬🤬#ENGvsIND #INDvsENG #SanjuSamson pic.twitter.com/blvkxdE8tb
— CRICSUJEET.CS (@ANCHORSUJEET) July 9, 2026
या सामन्यात भारताकडून केवळ श्रेयस अय्यरने ८० धावांची झुंजार खेळी केली, तर उर्वरित खेळाडू फ्लॉप ठरले. आपल्या खेळीबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी माझ्या वैयक्तिक कामगिरीवर समाधानी आहे. मात्र, जर तुमच्या खेळीमुळे संघाला विजय मिळत नसेल, तर त्या धावांचे महत्त्व कमी होते. मी जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा संघाला जिंकवून देणे हेच माझे ध्येय असते, पण दुर्दैवाने आज तसे झाले नाही.”
युवा खेळाडू आणि ‘ट्रान्झिशन’चा दिला दाखला –
SHREYAS IYER POST MATCH PRESENTATION INTERVIEW AFTER 5TH LOSS ON TROTT #EngvsInd pic.twitter.com/m0tsBFR8Y0
— R♡ (@ImRASOOL) July 9, 2026
पराभवाचे समर्थन करताना श्रेयस अय्यर शेवटी म्हणाला, “सध्या आमचा भारतीय संघ ‘ट्रान्झिशन’च्या (बदलाच्या) टप्प्यातून जात आहे. त्यामुळे आमच्याकडून चुका होणारच. संघातील अनेक युवा खेळाडू या परदेशी वातावरणात पहिल्यांदाच खेळत आहेत. त्यामुळे अशा चुका त्यांच्यासाठी शिकण्याची संधी असतील. परदेशातील परिस्थितीशी जुळवून घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्यांना होईल.” आता मालिकेतील अंतिम प्रतिष्ठेचा सामना शनिवारी साऊथम्पॅटनमध्ये खेळवला जाईल.





