India Worst Records : २७ वर्षांत जे घडलं नव्हतं ते घडलं! इंग्लंडने धुव्वा उडवताच भारतासह श्रेयसच्या नावावर झाली ९ लाजिरवाण्या विक्रमांची नोद
India Worst Records : या एकाच पराभवामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाच्या नावावर तब्बल ९ लाजिरवाण्या आणि नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.

IND vs ENG 4th T20I Bristol Match Team India 9 Worst Records List : भारतीय क्रिकेटसाठी सध्याचा काळ हा एका भयंकर वाईट स्वप्नासारखा ठरत आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा ९ गडी राखून दारुण पराभव केला. या मानहानीकारक पराभवासह इंग्लंडने मालिकेत ३-० अशी अजेय आणि ऐतिहासिक विजयी आघाडी घेतली आहे.
ब्रिस्टलच्या मैदानावर भारताने दिलेल्या १५९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडने तब्बल ३७ चेंडू शिल्लक ठेवून विजय साकारला. या एकाच पराभवामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाच्या नावावर तब्बल ९ लाजिरवाण्या आणि नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. ते कोणकोणते आहेत? जाणून घेऊया.
कर्णधार श्रेयस अय्यरचे लाजिरवाणे रेकॉर्ड्स:
- लागोपाठ ५ सामने गमावणारा पहिला कर्णधार: आयर्लंडविरुद्ध २ आणि इंग्लंडविरुद्ध सलग ३ सामने गमावून श्रेयस लागोपाठ ५ टी-२० सामने हरणारा इतिहासातील पहिलाच भारतीय कर्णधार बनला.
- सर्वात जलद ५ पराभव: श्रेयसने अवघ्या ६ पैकी ५ सामने गमावले. यापूर्वी विराटने १२, धोनीने १५ तर हार्दिकने १६ सामन्यांत ५ पराभव पाहिले होते.
England win the 4th T20I by nine wickets to take a 3-0 lead in the series.
Scorecard ▶️ https://t.co/vKZQwVKyYP#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/h8dw0OgWw6
— BCCI (@BCCI) July 9, 2026
टीम इंडियाच्या नावावर लागलेले डाग:
- लागोपाठ २ मालिका पराभव: सलग दोनदा टी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताने २०१९ नंतर पहिल्यांदाच सलग दोन द्विपक्षीय टी-२० मालिका गमावल्या आहेत.
- इंग्लंडचा ऐतिहासिक पहिला मालिका विजय: टी-२० क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडने भारताला द्विपक्षीय मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- विजयरथ रोखला: २०१९ नंतर भारताने खेळलेल्या सर्व टी-२० मालिका जिंकल्या होत्या, तो अश्वमेध इंग्लंडने रोखला.
- ब्रिस्टलचा २७ वर्षांचा गड उद्ध्वस्त: ब्रिस्टलच्या मैदानावर भारताने गेल्या २७ वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय सामना गमावला नव्हता, तो रेकॉर्ड मोडीत निघाला.
- इंग्लंडचा सर्वात मोठा विजय: ३७ चेंडू शिल्लक ठेवून मिळवलेला हा विजय इंग्लंडचा भारतावरील चेंडूंच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय आहे.
- भारताचा सर्वात खराब बचाव: १५०+ धावांचा बचाव करताना ३७ चेंडू आधी सामना गमावण्याची नामुष्की भारतावर कधीही आली नव्हती.
- १२ मालिकांनंतर पहिला पराभव: गेल्या १२ टी-२० मालिकांमध्ये अजिंक्य राहिलेल्या (११ विजय, १ बरोबरी) भारताला अखेर दारुण पराभवाचा सामना करावा लागला.





