नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक महागाई कमी करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून करीत असलेल्या प्रयत्नांना आता यश मिळू लागले आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी होऊन 4.87% मोजली गेली आहे.
केंद्र सरकारने जारी केली केलेल्या माहितीनुसार अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर कमी झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात महागाईचा टक्का कमी होण्यास मदत झाली आहे. सध्या असलेला मगाईचा दर हा तीन महिन्याचा निचांक आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित मागायचा दर 5.02% इतका होता. तर जून महिन्यात हा दर 4.87% इतका होता. 2022-23 या आर्थिक वर्षात महागाईचा दर तब्बल 6.7% होता.
तो कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अनेक वेळा व्याजदरात वाढ केली आहे. मात्र अगोदरच्या दोन पत धोरणात महागाई कमी होत असल्याचे पाहून रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केलेली नाही. सध्या असलेले व्याजदर उच्च पातळीवर कायम ठेवले आहेत.
यावर्षी महागाईचा दर साधारणपणे 5.4% राहील असे रिझर्व्ह बॅंकेने या अगोदर सांगितले होते. ऑक्टोबर महिन्यातील महागाईचा दर हा या उद्दिष्टापेक्षा कितीतरी कमी आहे. रिझर्व्ह बॅंकेने माहगाईचा दर चार टक्क्च्ा आत रोखण्याचे ठरविले आहे. मात्र देशातील आणि परदेशातील नकारात्मक परिस्थितीमुळे गेल्या अनेक महिन्यापासून या महागाईचा दर चार टक्क्यापेक्षा जास्त आहे. तो जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत रिझर्व बॅंक व्याजदरात कपात करणार नाही.
व्याजदर कपात होणार नाही
देशांतर्गत महागाई कमी व्हावी यासाठी रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वेळोवेळी वाढ केली आहे. आता रिझर्व्ह बॅंक व्याज दरात कपात कधी करणार असे विचारले असता काही विश्लेषकांनी सांगितले की, एकूण महागाईची आकडेवारी पाहता 2024 च्या पहिल्या सहा महिन्यात रिझर्व्ह बॅंक या संदर्भात काही विचार करू शकेल. मात्र दरम्यानच्या काळामध्ये परिस्थिती आणखी बिघडली तर ती शक्यता मंदावू शकते.