नवी दिल्ली – जागा वाटपाबाबतची प्रक्रिया सुरू करावी, यावर चर्चा झाली. देशभरात सभा घेण्याचं ठरलं आहे. भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सभा घेतली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती कॉंग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली. कॉंग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आजच्या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले याविषयी माहिती दिली.
इंडिया आघाडीत सुरु असलेल्या घडामोडींमुळे भाजपचं देखील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कारण इंडिया आघाडीचे नेते आता देशभरात फिरणार आहेत. इंडिआ आघाडीची पहिली सभा ही भोपाळमध्ये घेण्यात येणार आहे. देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ही सभा पार पडणार आहे. या सभांमधून इंडिया आघाडीचे नेते भाजपवर घणाघात करणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी या सभा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
#WATCH | On INDIA alliance Coordination Committee meeting, Congress General Secretary KC Venugopal says, “The Coordination Committee has decided to start the process for determining seat-sharing. It was decided that member parties would hold talks and decide at the earliest. The… pic.twitter.com/JnOmapYJ7Z
— ANI (@ANI) September 13, 2023
समितीच्या सदस्यांनी अजेंडा तयार केला असून, त्याला बैठकीत अंतिम रूप दिले गेले. या बैठकीत संयुक्त रॅली, संयुक्त प्रचार आणि सोशल मीडिया रणनीती यावर निर्णय घेण्यात आले. निवडणूक आणि प्रचाराचा रोडमॅप तयार करण्यासाठी राज्यांची 4 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा पहिल्या आणि महत्त्वाच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या श्रेणीतील पाच राज्यांमध्ये आघाडीची ताकद आणि समान रणनीती यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या 212 जागा असून त्यापैकी 180 हून अधिक जागा भाजपकडे आहेत. 2019 नंतर या राज्यांची राजकीय स्थिती बदलली आहे. यूपीमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सपा केवळ 47 जागांवर घसरली होती. 2022 मध्ये त्याच्या जागा 111 पर्यंत वाढतील.
विविध राज्यांमध्ये वेगवेगळी समिकरणे…
बिहारमध्ये जेडीयूने भाजपपासून दूर राहून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले आहे. झारखंडमध्येही विरोधी पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात सरकार एनडीएचे आहे, तरीही शरद पवार-उद्धव ठाकरे जोडी कॉंग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा दावा कॉंग्रेस करत आहे. अशाच प्रकारे विविध राज्यांना वेगवेगळ्या विभागात विभागले गेले आहे. त्यानुसार तेथे सभा तसेच बैठक आयोजित करण्यात येईल.